Friday, July 21, 2006

अथांग

SMS च्या शेवटी 'with love' म्हणून लिहिलं
तर रागवण्याऐवजी स्वत:शीच हसशील का?

एखाद्या शनिवारी "चल जाऊ फ़िरायला."
म्हटलं तर येशील का?

तुझ्याबरोबर फ़िरताना दुसऱ्या मुलीकडे बघितलं
तर लटक्या रागाने माझा कान ओढशील का?

घरी कधी आलीसच तर
एक कप चहाचा माझ्या हातचा घेशील का?
.
तुला मी विचारल आणि तू नाही म्हटलंस
तरी तू माझ्याशी पूर्वीसारखीच वागशील का?
--अभिजित

Labels:

4 Comments:

At 7:45 PM, July 21, 2006 , Blogger शैलेश श. खांडेकर said...

चांगले प्रश्न विचारले आहेत, :)

 
At 8:04 PM, July 21, 2006 , Blogger abhijit said...

:-)

 
At 11:52 PM, July 21, 2006 , Anonymous Anonymous said...

शेवट्चा प्रश्न छान.

 
At 11:18 AM, July 25, 2006 , Blogger abhijit said...

@bharati: Abhari ahe. Khara manatla prashn toch aahe..barobar olakhlas.

 

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home