Friday, May 05, 2006

चाहूल-२

घण घण घण गरजत घन आले दाटुनिया..
सर सर सर सरसावून सरी आल्या धावुनिया..
अवखळ अबलख वारा बेफ़ाम होऊनिया....
उडवी ओढणी माझी टाके भिववूनिया..

धीर कसा धरू मी कुणी नाही आधाराला
गेला कुठे सजना टाकुन मज एकटीला
संध्या ही सरत आली हाक मारु कुणाला
लखलख वीज चमकुन गेली काळीज भेदुनिया

शहारले अंग सारे धडधड काही थांबेना
पावसाच्या धाकाचा अंत काही दिसेना
चंचल मन हेलावुन साद देई सख्याला
थकले थिजले शरीर गेले मरगळुनिया

उंबऱ्यावर हळुवार त्याची पाऊले वाजली..
चटकन कशी काय सगळी घालमेल थांबली..
हरखुनि दिला देह सारा त्या हाती लोटुनिया..
पाही खिडकीतून अवघा आसमंत थबकुनिया..

Labels:

3 Comments:

At 10:44 AM, May 25, 2006 , Anonymous Anonymous said...

Chhan aahe kavita .... saatatyaane lihit raha.......

 
At 11:17 PM, May 26, 2006 , Anonymous Anonymous said...

कराडमधे कुठे रहाता?

 
At 11:52 AM, May 29, 2006 , Blogger abhijit said...

vidyanagar. u give me your details. at least name. My emaild ID is in profile.

 

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home